पु. ल. देशपांडे यांचे 35 विचार | Pu La Deshpande Quotes in Marathi

Pu La Deshpande Quotes in Marathi : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पु.ल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण पु. ल. देशपांडे यांचे विचार (Pu La Deshpande Quotes in Marathi) जाणून घेणार आहोत.

पु. ल. देशपांडे यांचे विचार (Pu La Deshpande Quotes in Marathi)

पु. ल. देशपांडे यांचे विचार (Pu La Deshpande Quotes in Marathi)

1) जगा इतके की आयुष्य कमी पडेल. हसा इतके की आनंद कमी पडेल.

2) काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भाग पडेल.

3) समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

4) भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.

5) ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येते, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येते, त्याला उचलता येत नाही. विचित्र आहे, पण सत्य आहे.

6) खरं तर सगळे कागद सारखेच. फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.

7) क्रियापदाचं मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेले कर्म किती मोठे याच्यावर अवलंबून असते.

8) मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पाय देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते.

9) चोरीमध्ये वाईट काहीच नसतं. तुम्ही काय चोरता याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही जर एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?

10) माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणूस हा गेलेली केस नसावा.

11) मराठीला जी “मज्जासंस्था” वाटते, तीच इंग्रजीला “नर्वस सिस्टम” वाटते. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे.

12) उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल. पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं, हे सांगून जाईल.

13) कुणी असं म्हटलंय. कसा मी? कसा मी? कसा मी? जसा मी, तसा मी, असामी. खरं सांगू का? हे कोणी वगैरे म्हटलेलं नाही. मीच म्हटलंय. पण कोणीतरी म्हटलंय, असं म्हटल्याशिवाय तुम्ही कान टवकारून काय म्हटलंय, ते ऐकलं नसतं. ‘जगात काय म्हटलंय’ यापेक्षा ‘कोणी म्हटलंय’ यालाच अधिक महत्त्व आहे. ते मला कळून चुकलंय.

14) जाळायला काहीचं नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

15) आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे.

पु. ल. देशपांडे यांचे सुविचार (Pu La Deshpande suvichar in Marathi)

16) अडचणी कोणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. ती सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीं पलिकडील समस्या अस्तित्वातच नाही.

17) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

18) माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भीती वाटते.

19) बोलायला कुणीच नसणं, यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहोचणे ही शोकांतिका जास्त भयाण.

20) आपलाही कोणाला त्रास होऊ शकतो, हि जाणीव फार भयप्रद आहे.

21) सगळे वार परतवता येतील. पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.

22) कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपुर्वाई आहे.

23) आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

24) रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभे राहावे लागते.

25) कलेच्या क्षेत्रामध्ये तुमचं जे काही व्यक्तित्व, जे काही अस्तित्व, जी काही अस्मिता असेल, जे गुण असतील ते तुमचे स्वतःचे घेऊन तुम्हाला उभे राहावे लागेल.

26) जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत किंवा दुःखाच्या.

27) काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली, त्यांनी आपला न्याय अमलात आणला. ज्याचे बळ, त्यांचा काळ आणि ज्यांचा काळ, त्यांचा न्याय.

28) आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते, तर जगायला गंमत आणि देवाला किमत राहिली नसती.

29) चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही.

30) नोकरी म्हणजे आठ तासांचा धंदा आणि धंदा म्हणजे 24 तासांची नोकरी.

31) पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.

32) लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते.

33) आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जीन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.

34) सत्य कायम टोचते. कारण त्यामध्ये पॉईंट असतो.

35) जीवनाचा अभ्यास कधी संपत नाही. त्यात रोज काहीतरी नित्यनवीन असतं. अनुभवामध्ये शिळेपण नसतं. रोज आपल्यासाठी नवीन काहीतरी असतं.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पु. ल. देशपांडे यांचे विचार (Pu La Deshpande Quotes in Marathi) जाणून घेतले. पु. ल. देशपांडे यांचे सुविचार (Pu La Deshpande suvichar in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

One thought on “पु. ल. देशपांडे यांचे 35 विचार | Pu La Deshpande Quotes in Marathi

  1. यातील खूपशी वाक्ये व पू काळे यांची आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *